वडसा-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी तब्बल १८८६.५ कोटी रुपये मंजूर या सोबतच मंत्रीमंडळाने घेतले मोठे निर्णय

✅ कायदा व सुव्यवस्थेसाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर

राज्यातील कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी “मार्वल – महाराष्ट्र रिसर्च अँड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोर्समेंट लि.” हे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणारे केंद्र कार्यान्वित होणार आहे. शक्ती प्रदत्त समितीच्या अंतर्गत कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीने गुन्हेगारी नियंत्रणासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा निर्णय झाला आहे.

✅ गडचिरोली जिल्ह्यातील खनिज संपत्तीच्या व्यवस्थापनासाठी नवीन यंत्रणा

गडचिरोली जिल्ह्यात खनिज संपत्तीचा सुयोग्य विकास आणि स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी “गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण” स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

https://watadya.in/kccnewlimitupdate

✅ वाहनधारकांसाठी दिलासा – जुनी वाहने स्क्रॅप करण्यासाठी कर सवलत!

नवीन वाहन धोरणांतर्गत नोंदणीकृत स्क्रॅपिंग केंद्रामध्ये वाहन निष्कासन करण्यासाठी कर सवलत देण्यात येणार आहे. यामुळे जुन्या वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होणार असून नवीन वाहने घेणेही सोपे होईल.

✅ बाईक टॅक्सी साठी नवीन नियमावली

राज्यातील १ लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमध्ये बाईक टॅक्सी वाहतुकीला परवानगी देण्याचा निर्णय झाला आहे. यामुळे लोकांना प्रवासासाठी स्वस्त आणि सोयीस्कर पर्याय मिळणार आहे.

✅ पिण्याच्या पाण्यासाठी मोठा निधी मंजूर

नंदूरबार जिल्ह्यातील नागन मध्यम प्रकल्पासाठी तब्बल १६१.१२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटेल आणि शेतीसाठीही पाणी उपलब्ध होईल.

✅ बीड जिल्ह्यातील सिंदफणा नदीवरील पाणी साठवण क्षमतेत वाढ

👉 निमगाव (ता. शिरूर) बंधाऱ्याच्या सुधारणेसाठी २२.०८ कोटी रुपये मंजूर.

👉 ब्रम्हनाथ येळंब (ता. शिरूर) बंधाऱ्याच्या सुधारणेसाठी १७.३० कोटी रुपये मंजूर.

👉 टाकळगाव (ता. गेवराई) बंधाऱ्याच्या सुधारणेसाठी १९.६६ कोटी रुपये मंजूर.

यामुळे या भागातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे आणि पाण्याचा ताण कमी होईल.

✅ गडचिरोलीसाठी मोठा रेल्वे प्रकल्प मंजूर

👉 वडसा-देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी तब्बल १८८६.५ कोटी रुपये मंजूर.

👉 यातील ५०% म्हणजेच ९४३ कोटी रुपये राज्य सरकार देणार आहे.

👉 यामुळे गडचिरोलीतील व्यापार, वाहतूक आणि दळणवळणाला गती मिळेल.

https://watadya.in/summer25precautionandstatusthisyear

✅ पुणे-शिरूर-अहिल्यानगर मार्गे छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गाचा विकास

👉 या महामार्गाची सुधारणा करण्यात येणार असून काम पूर्ण झाल्यानंतर वाहनांवर टोल (पथकर) लागू होणार आहे.

✅ नागपूरमध्ये नव्या क्रीडा संकुलाला मंजुरी

👉 अजनी, नागपूर येथील देवनगर को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या जागेवरील क्रीडांगणाचे आरक्षण हटवून ते रहिवासी क्षेत्र म्हणून घोषित करण्याचा निर्णय.

✅ ठाणे जिल्ह्यातील ५०० शेतकऱ्यांना अनुदानाचा मोठा दिलासा!

👉 मुरबाड तालुक्यातील ५०० शेतकऱ्यांना धानाच्या विक्रीसाठी २०२०-२१ च्या हंगामासाठी ७९ लाख ७१ हजार २९२ रुपये अनुदान मंजूर.

👉 यामुळे या भागातील शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल.

राज्याच्या विकासाला वेग!

या निर्णयांमुळे महाराष्ट्रातील कृषी, वाहतूक, पाणीपुरवठा, उद्योग आणि क्रीडा क्षेत्राला मोठी चालना मिळणार आहे. सरकारने घेतलेले हे निर्णय जनतेच्या गरजा लक्षात घेऊनच घेतले असून, भविष्यात त्याचा मोठा फायदा होईल.

मित्रांनो, या निर्णयांबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला या योजनांचा फायदा होणार आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा!